विठोबाच्या दर्शनाची आस: ज ...
गेल्या 800 वर्षा पासूनची ही परंपरा चालत आलेली विठ्ठल नांवाचा गजर दारोदारी घरोघरी दुमदुमतो. आषाढी एकादशी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. तो आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला साजरा केला जातो. या दिवशी विठोबा, जो पंढरपूरच्या विठ्ठलाचे रूप आहे, त्याची विशेष पूजा केली जाते. हा सण विशेषतः महाराष्ट्रात अत्यंत श्रद्धेने साजरा केला जातो.
आषाढ महिना म्हटलं की उपवास तापास पेरण्या संपून विठोबारायाच्या भक्तीत तल्लीन होण्याचे दिवस. महाराष्ट्राला लाभलेले पंढरपूरचा विठोबा हे दैवत. या दिवशीच्या व्रतास सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते, अशी मान्यता आहे. पंढरपूरच्या वारीची थोरवी गावी, ऐकावी तेवढी थोडीच आहे. वारीबद्दल सांगण्यापेक्षा ती अनुभवण्याला प्रथम प्राधान्य दिले जाते.
आषाढी एकादशी हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे, जो आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीला साजरा केला जातो. या दिवसाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पंढरपूर येथे विठोबा किंवा विठ्ठलाचे पूजन आणि पालखी सोहळा. याचे विशेष महत्व खालीलप्रमाणे आहे:
विठोबाची भक्ती: या दिवशी विठोबाच्या भक्तांनी विठ्ठल विठ्ठल अशा जयघोषात सहभागी होणे हे एक भक्तीचे रूप आहे. पंढरपूरच्या विठोबाच्या चरणी लीन होऊन भक्तगण आषाढी एकादशीला भक्तिरसात तल्लीन होतात.
पालखी सोहळा: आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकऱ्यांची मोठी मिरवणूक निघते, ज्याला 'वारी' म्हटले जाते. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या पालख्या पुण्याहून पंढरपूरला जातात. लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी येतात.
उपवास आणि पूजा: या दिवशी उपवास धरला जातो. उपवासाच्या निमित्ताने भक्त आपले शरीर आणि मन शुद्ध करतात आणि विठोबाच्या चरणी आपली प्रार्थना अर्पण करतात.
धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा: आषाढी एकादशीच्या निमित्ताने अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भजन, कीर्तन, प्रवचन या गोष्टींचे आयोजन करून भक्तांना अध्यात्मिक आनंद दिला जातो.
समाजसेवा आणि एकात्मता: या सोहळ्यातून समाजातील सर्व स्तरातील लोक एकत्र येतात. एकत्रितपणाचा आणि समानतेचा संदेश या सोहळ्यातून दिला जातो.
आषाढी एकादशी हा सण भक्तिरसाने ओतप्रोत असून तो विठोबाच्या उपासनेला समर्पित आहे. या दिवसाच्या निमित्ताने भक्त विठोबाच्या चरणी लीन होतात आणि त्याच्या कृपेची प्रार्थना करतात.
आषाढी एकादशी कशी मनवली जाते?
मराठी वर्षातील सगळ्यांना हवा हवासा महीना. एकादशी आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. आषाढी एकादशीला महाराष्ट्रात वेगळे अन्यन्य साधारण महत्त्व आहे. प्रत्येक आषाढी एकादशीला पंढरपूरला वारकरी वारी घेऊन जातात. आषाढी एकादशी म्हटले की, प्रथम उभा विटेवरी पांडूरंग,लोचनी दिसे भक्ती भाव, ती पंढरपूरची वारी.पंढरपूरच्या वारीची थोरवी गावी, ऐकावी तेवढी थोडीच आहे. वारीबद्दल सांगण्यापेक्षा ती अनुभवण्याला प्रथम प्राधान्य दिले जाते.
व्रत पालन:
या दिवशी सकाळी स्नान करून देवघर स्वच्छ करावे.
विठोबाच्या मूर्तीची पूजा करावी.
उपवास करण्याचा संकल्प करावा.
अन्न ग्रहण:
उपवास करणाऱ्यांनी फक्त फळ, दूध, आणि फराळाचे पदार्थ खाणे.
काही भक्त पूर्ण उपवास करतात आणि फक्त पाणी पितात.
पूजा आणि आरती:
विठोबाची विविध प्रकारच्या फुलांनी, तुळशीच्या पानांनी पूजा करावी.
भजन, कीर्तन, आणि आरती करावी.
ध्यान आणि मंत्रजप:
गरजूंना अन्न, कपडे, किंवा पैसे दान करावे.आषाढी एकादशी एक भक्तीमय पर्व आहे, ज्यामध्ये भक्त विठोबाच्या उपासनेत मग्न होऊन आध्यात्मिक आनंद प्राप्त करतात.
ठरलेल्या तिथींना आळंदी, देहूहून संतांच्या पालख्यांनी प्रस्थान ठेवले.
पंढरपूर आषाढी वारी सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस व आरोग्य विभाग सज्ज झाला आषाढी यात्रेवर यंदा पंढरपुरात चारशे वारकऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे.
या सोहळ्यादरम्यान अंमलबजावणीसाठी तब्बल २ हजार ३०० पोलीस तैनात राहणार आहेत.
आषाढी एकादशी आणि उपवास
भारतीय परंपरेत उपवास आरोग्य जपण्याचा मार्ग या दिवसी संपूर्ण दिवस उपवास करायचा असतो. पूजा अर्चा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात.हे यासाठी की घरात वातावरण प्रफुल्लित आणि शुध्द भाव मनी विसावा. वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक प्रमुख संप्रदाय आहे. या संप्रदायात वार्षिक, सहामाह याप्रमाणे जशी दीक्षा घेतली असेल, तशी वारी करतात. ही वारी पायी केल्याने शारीरिक तप घडते, असे समजले जाते.
आधी तल्लीनता जयघोष "विठ्ठल विठ्ठल"
पृथ्वीवरील सर्वांत पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो. महाराष्ट्राची काशी म्हणून पंढरपूर क्षेत्र ओळखले जाते. पंढरपूरला मरण्यापुवी जावे, एकदातरी विठू माऊलीचे दर्शन घ्यावे हीच मनोमन इच्छा असते.
दर्शनाची आस
अनुभव याची देही याची डोळा घ्यावा हर एक भक्ताची आस असे म्हटले जाते पंढरपूर नगरात तल्लीनता मनी लाभते सद कर्म आपोआप घडतात. एकदा तरी पंढरपूरची वारी करावी, असे आग्रहाने वडीलधारी मंडळी आवर्जून सांगतात. सुमारे ८०० वर्षांपासून वारीची परंपरा अविरतपणे सुरू आहे, अशी मान्यता आहे. आषाढी एकादशीला पंढरपुरास आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. आषाढीच्या वारीस भरभराटीची,सुखांची,आनंदाची, चैतन्याची वारी म्हणतात. शेतकरी आपल्या शेतात पेरणी आटपून वारीला निघतात आणि ते घरी जाईपर्यंत शेत डोलदार वाढावे ही मनोमन कामना. यातुन सुखसमृध्दी यावी घर धनधान्याने भरून निघावे हेच शेतकरी चिंतन मनन करतो त्याचप्रमाणे आषाढी वारीच्या दिवशी वारकरी प्रेमाची देवाणघेवाण आपल्या माणसाची जपणूक, साठवण करतो तीची शिदोरी गाठीला बाधून सदभाव व्यवहारात आणतो.
आषाढी वारीचे महत्त्व
अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात
अभंग कीर्तनातून तल्लीनता येते.
"अंह" "मी पणा" समूळ नष्ट व्हायला मदत मिळते.
मनी भक्ती भाव दयाळू पणा अंगी येतो.
वारी ही पायी करावी लागते यामुळे अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.
शारिरीक आणि मानसिक बदल घडवून येतात.
या परंपरेचा देशातच नाही तर जागतिक स्तरावर संशोधनाचा करतात पर्यटक,विविध संस्था,संघटना संशोधन करताना दिसतात. वारी अनुभवण्यासाठी जागतिक पातळीवरील अभ्यासक, संशोधक वारीमध्ये सहभागी होत असतात. या दिवशी वारकरी चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात.आपल्या सूचनांमधून आमचा पुढील ब्लॉग आणखी चांगला बनवू शकतो, म्हणून कृपया टिप्पणी द्या, जर आपण ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीवर समाधानी असाल तर इतर पालकांसह सामायिक करा.
Be the first to support
Be the first to share
Comment (0)