पालकांनी आपल्या पाल्याचे मित्र कसे व्हावे? मार्गदर्शक टिप्स

Only For Pro

Reviewed by expert panel
वाढत्या वयानुसार मुले आणि पालक यांच्यात हळूहळू अंतर का येऊ लागते? या वाढत्या पिढीच्या अंतरामागे अनेक कारणे असू शकतात. जसे पालक मुलांसोबत वेळ न घालवणे,सवांद संपणे, वारंवार ओरडणे किंवा बळाचा वापर करणे, मुलांचा आदर न करणे, त्यांचे निर्णय त्यांच्यावर लादणे इत्यादी.
पण आपण पालक असल्याने या मुलाच्या वाढत्या वयात मुलांपासून दूर जाण्याची नाही तर त्यांचे मित्र बनण्याची गरज आहे, हे समजून घेणे फार गरजेचे आहे. हे असे वय असते जेव्हा मुलांना त्यांच्या मित्रांची सर्वात जास्त गरज असते. पण मुलांचे मित्र कसे बनायचे? यासाठी काही पद्धती किंवा वर्तनातील बदल खाली नमूद केले आहेत. त्यांना समजून घ्या आणि तुमच्या मुलांचे मित्र तसेच जवळचा जिवलग बना!
मुलांशी मैत्री करण्यासाठी या टिप्स पाहू या!
किशोरवयात मुलांमध्ये होणारे बदल आणि त्यांची वागणूक समजून घ्या
वाढत्या वयात मुलांमध्ये अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होतात. जेव्हा ते इतर लोकांकडे आकर्षित होऊ लागतात, तेव्हा त्यांना पालकांच्या बंधनातून किंवा जबरदस्तीपासून दूर जायचे असते. त्यांना स्वतंत्र व्हायचे असते. या बदलामुळे मुलं जिथं त्यांच्या मित्रांच्या जवळ जातात, तिकडे पालकांपासून दूर होतात. म्हणूनच या वाढत्या वयात पालकांनी मुलांमधील बदल आणि त्यांच्या वागणुकीबद्दल समजून घेणे आणि त्यानुसार त्यांच्या वागण्यात बदल घडवून आणणे महत्त्वाचे आहे.
मुलांसोबत वेळ घालवा
हे असे वय असते जेव्हा मुलांना सांगायचे असते तसेच त्यांच्या बर्याच गोष्टी लपवायच्या असतात कारण त्यांचे बोलणे ऐकल्यानंतर काय प्रतिक्रिया येईल हे त्यांना समजत नाही. अशा परिस्थितीत, मुलांसोबत जवळजवळ दररोज थोडा वेळ घालवणे आणि त्यांना आपल्या शहाणपणाच्या आणि मूर्खपणाच्या गोष्टी सांगणे महत्वाचे आहे. या कथांमुळे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होईल की ते सर्व प्रकारच्या गोष्टी तुमच्याशी शेअर करू शकतील असे वातावरण निर्मिती करा. जेव्हा मुलं त्यांच्या कथा/अनुभव तुमच्यासोबत शेअर करायला लागतात, तुम्ही त्यांच्यासोबत हसायला आणि रडायला लागतात किंवा त्यांच्या समस्या ऐकून त्यांना सल्ले द्यायला लागतात, तेव्हा तुमचं नातं आई-वडिलांपेक्षा पण मित्रांपेक्षा जास्त बनतं.
त्यांचा दृष्टिकोन आणि निर्णय समजून घ्या आणि त्यांचा आदर करा
वाढत्या वयात मुले आणि पालक यांच्यात अनेकदा तणाव निर्माण करणारी एक गोष्ट म्हणजे कोणत्याही गोष्टीबद्दल लादणे किंवा जबरदस्ती करणे. कारण या वयात मुलांना स्वतंत्र होऊन स्वतःचे निर्णय घ्यायचे असतात. स्वतःहून निर्णय घेण्यास सक्षम असण्याची ही भावना त्यांचा आत्मविश्वास वाढवते ज्यामुळे त्यांना निर्णय घेण्यास मदत होते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो. त्याचबरोबर या स्वातंत्र्यामुळे मुलांच्या मनात पालकांबद्दल आदर निर्माण होतो. त्यांना त्याच्यामध्ये लहान मुलांना हुकूम देणार्या व्यक्तीची प्रतिमा दिसत नाही, तर त्यांचा आणि त्यांच्या निर्णयांचा आदर करणाऱ्या व्यक्तीची प्रतिमा दिसते.
बदलत्या काळानुसार येणारे बदल स्वीकारा
पालक आणि वाढणारी मुले यांच्यातील अंतराचे एक कारण म्हणजे त्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या विचारसरणीतील फरक. हे समजून घेणे फार महत्वाचे आहे की मुलांच्या वाढत्या वयात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते ज्याची उत्तरे फक्त तुम्ही पालक म्हणून देऊ शकता. पण यासाठी तुम्ही स्वतःला आजच्या काळात आणि तुमच्या मुलांच्या जागी ठेवणं गरजेचं आहे. याचा अर्थ आजच्या काळात घडणाऱ्या सर्व गोष्टी योग्य आहेत, असे अजिबात नाही, त्यामुळे मुलांना समजून घ्या आणि समजावून सांगा.
सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमच्या मुलाला योग्य आणि अयोग्य यातील फरक समजावून सांगणे आणि तुम्ही त्यांना मैत्रीपूर्ण वागणूक देऊन त्यांना नीतिमान आणि चांगला माणूस बनवण्यासाठी प्रेरित करू शकता.
Be the first to support
Be the first to share
Comment (0)
Related Blogs & Vlogs
No related events found.
Loading more...