"मुलांचे मित्र व्हा पिढीतील अंतर टाळा"

All age groups

Sanghajaya Jadhav

2.6M दृश्ये

3 years ago

 "मुलांचे मित्र व्हा पिढीतील अंतर टाळा"

Only For Pro

blogData?.reviewedBy?.name

Reviewed by expert panel

Dr. Himani Khanna

सामाजिक आणि भावनिक
व्यवहार
आगळीक

पिढीतील अंतर (जनरेशन गॅप) म्हणजे दोन वेगवेगळ्या पिढ्यांमधील मतभेद,व्यक्तीमधील भिन्न विचारसरणी!! वाढत्या वयानुसार मुले आणि पालक यांच्यात हळूहळू अंतर येऊ लागते. या अंतराची अनेक कारणे असू शकतात. उदाहरणार्थ,

Advertisement - Continue Reading Below
  • पालक मुलांसोबत वेळ घालवत नाहीत,
  • वारंवार ओरडणे किंवा जबरदस्ती करणे,
  • मुलांचा आदर न करणे,
  • त्यांचे निर्णय त्यांच्यावर लादणे इत्यादी.
  • पण या वाढत्या वयात मुलांपासून दूर जाण्याची नाही तर त्यांचे मित्र बनण्याची गरज आहे, हे पालक म्हणून समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
  • हे असे वय असते जेव्हा मुलांना त्यांच्या मित्रांची सर्वात जास्त गरज असते.

 मुलांचे मित्र कसे बनवायचे? यासाठी काही पद्धती किंवा वर्तनातील बदल खाली नमूद केले आहेत. त्यांना समजून घ्या आणि तुमच्या मुलांचे मित्र व्हा

मुलांशी मैत्री करण्यासाठी या टिप्स वापरून पहा

किशोर वयात मूल आणि त्यांच्या वागण्यात होणारा बदल समजून घ्या – वाढत्या वयात मुलांमध्ये अनेक शारीरिक आणि मानसिक बदल घडतात. ते इतर लोकांकडे आकर्षित होत असताना, त्यांना त्यांच्या पालकांच्या नियम , अति देखरेख जबरदस्तीपासून दूर जायचे आहे. मुलांना बंधनं नकोशी असतात त्यांना स्वतंत्र व्हायचे आहे. या बदलामुळे मुलं जिथं त्यांच्या मित्रांच्या जवळ जातात, तिथं ते पालकांपासून दूर होतात. म्हणूनच या वाढत्या वयात पालकांनी मुलांमधील बदल आणि त्यांच्या वागणुकीबद्दल समजून घेऊन त्यानुसार त्यांच्या वागण्यात बदल घडवून आणणे गरजेचे आहे.

मुलांसोबत वेळ घालवा

हे वय असे आहे की मुलांना त्यांच्या बर्‍याच गोष्टी सांगायच्या आणि लपवायच्या असतात कारण त्यांचे बोलणे ऐकून त्यांची प्रतिक्रिया कशी असेल हे त्यांना समजत नाही. अशा परिस्थितीत, मुलांसोबत जवळजवळ दररोज थोडा वेळ घालवणे आणि त्यांना त्यांच्या समज आणि अज्ञानाच्या गोष्टी सांगणे आवश्यक आहे. त्याच्याशी संपर्काने किंवा या कथांमुळे त्यांना विश्वास बसेल की ते सर्व प्रकारचे किस्से तुमच्याशी शेअर करू शकतात. जेव्हा मुलं त्यांच्या अनुभव तुमच्यासोबत शेअर करू लागतात, त्यांच्यासोबत हसायला लागतात किंवा त्यांच्या समस्या ऐकून त्यांना सूचना देऊ लागतात, तेव्हा तुमचे नाते पालकांपेक्षा मित्रांचे बनते.

त्यांचे शब्द आणि निर्णय समजून घ्या आणि त्यांचा आदर करा

वाढत्या वयात मुले आणि पालक यांच्यात अनेकदा तणाव निर्माण करणारी एक गोष्ट म्हणजे कोणत्याही गोष्टीबद्दल जबरदस्ती किंवा धमकावून सांगणे. यामागचे कारण ही तसेच आहे या वयात मुलांना स्वतंत्र होऊन स्वतःचे निर्णय घ्यायचे असतात. स्वतःहून निर्णय घेण्यास सक्षम असण्याची ही भावना त्यांचा आत्मविश्वास वाढवते ज्यामुळे त्यांना निर्णय घेण्यास आणि त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. तसेच हे स्वातंत्र्य मुलांच्या हृदयात पालकांबद्दल आदर निर्माण करते. त्यांना त्यांच्यामध्ये मुलांवर हुकूम करणार्‍या व्यक्तीची प्रतिमा दिसत नाही, तर त्यांचा आणि त्यांच्या निर्णयांचा आदर करणारी व्यक्ती दिसते.

बदलत्या काळानुसार येणाऱ्या बदलांशी जुळवून घ्या

पालक आणि वाढणारी मुले यांच्यातील अंतराचे एक कारण म्हणजे त्यांच्या आणि त्यांच्या पालकांमधील विचार आणि समजून घेण्याच्या पद्धतीतील फरक. हे समजून घेणे फार महत्वाचे आहे की वाढत्या वयात मुलांना अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते ज्याचे उत्तर फक्त तुम्ही पालक म्हणून देऊ शकता. पण त्यासाठी आजच्या काळात स्वत:ला आणि मुलांच्या जागी पाहणं गरजेचं आहे. याचा अर्थ आजच्या काळात घडणाऱ्या सर्व गोष्टी बरोबर आहेत अस अजिबात नाही, त्यामुळे मुलांना समजून घ्या आणि समजावून सांगा.

सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमच्या मुलाला योग्य आणि अयोग्य यातील फरक समजावून सांगणे आणि तुम्ही त्यांना मैत्रीपूर्ण वागणूक देऊन त्यांना जबाबदार आणि चांगला माणूस बनवण्यासाठी प्रेरित करू शकता.

तुमच्या एका सुचनेमुळे आमचा पुढचा ब्लॉग अधिक चांगला होऊ शकतो, तर कृपया कमेंट करा, ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीने तुम्ही समाधानी असाल तर नक्कीच इतर पालकांसोबत शेअर करा.

Be the first to support

Be the first to share

support-icon
Support
share-icon
Share

Comment (0)

share-icon

Related Blogs & Vlogs

No related events found.

Loading more...