अक्षय्य तृतीयेला आवर्जून बनवण्यात येणारी कटाची आमटी रेसिपी!!

Only For Pro

Reviewed by expert panel
अक्षय्य तृतीया हा सण घराघरात साजरा केला जाणारा सर्वांच्या आवडीचा आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी जे शुभ कार्य केलं जातं त्याचं फळ हे अक्षय मिळतं असे समजले जाते. अक्षय म्हणजेच ज्याचा कधीही क्षय होणार नाही असे. या प्रथे मुळे हा दिवस हिंदू धर्मात शुभ मानला जातो. अक्षय्य तृतीयेची माहिती आपल्याला असलीच पाहिजे.
अक्षय्य तृतीया म्हणजे काय?
संस्कृतमध्ये, अक्षय (अक्षय) या शब्दाचा अर्थ "समृद्धी, आशा, आनंद, यश" या अर्थाने "कधीही कमी होत नाही" आसा घेतला जातो, तर तृतीया म्हणजे "चंद्राचा तिसरा टप्पा" असा होतो. हिंदू दिनदर्शिकेतील वैशाख महिन्याच्या तिसर्या चंद्र दिवसावरून हे नाव देण्यात आले आहे, जेव्हा तो साजरा केला जातो.
अक्षय्य तृतीया हा विष्णूचा सहावा अवतार परशुरामाचा जन्मदिवस म्हणून हिंदू मानतात. ते वैष्णव मंदिरात पूजनीय आहेत. जे परशुरामाच्या सन्मानार्थ ते पाळतात ते कधीकधी परशुराम जयंती म्हणून या सणाला संबोधतात.
कटाची आमटी
कटाची आमटी एक महाराष्ट्रियन डिश आहे ज्यात चण्याची डाळ व याची चव गोड, अंबट अशी असते. ह्या डिशचा स्वाद कोल्हापूर जिल्ह्यातील खास आहे. त्यामुळे लोक या डिशला कटाची आमटी असे प्रमाणित करतात की ह्यामध्ये कट, शिजवलेली चण्याची डाळ, हिरव्या मिरची आणि जीरा असे प्रमुख साहित्य वापरले जाते. जेव्हा पुरण पोळी बनवतात तेव्हा पुरण बनवताना चण्याची डाळ शिजवली जाते तर ती शिजविल्यावर जे पाणी उरते त्याला कटाचे पाणी म्हणतात, ज्यामध्ये थोडी शिजवलेली चण्याची डाळही ठेवावी. त्यापासून कटाची आमटी बनवतात, जी पुरणपोळी बरोबर खायला देतात. त्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून ही कटाची आमटी खूपच मस्त चविष्ट लागते.
कटाची आमटी रेसिपी
साहित्य
- आवश्यकते नुसार कटाचे पाणी ज्यामध्ये थोडी शिजवलेली चण्याची डाळही ठेवावी
- गरजे नुसार तेल
- कांदा
- टोमॅटो
- लसूण पाकळ्या
- आल्याचे तुकडे
- कापलेले नारळ तुकडे
- मोहरी
- जीरे
- हिंग
- पांढरे तीळ
- खसखस
- काळा मसाला
- धणे पावडर
- हळद
- कोथिंबीर
- कढीपत्ता
- गरजेनुसार पाणी
- चवीनुसार मीठ
कृती
कढईमध्ये तेल गरम करा.कांदा, खोबरे ,तीळ .खसखस सुमारे तीन चार मिनिटे परतून घ्या.मसाला मिक्सरच्या भांड्यात घ्या आणि बारीक वाटून घेणे त्या मध्ये वाटताना लसूण, आले आणि कोथिंबीर ही घाला. कमीतकमी पाणी घालून घट्ट आणि बारीक वाटून घ्या. फोडणी देताना तेलात मोहरी घाला आणि मोहरी तडतडली कि त्यामध्ये ठेचलेला लसून आणि कढीपत्ता घाला आणि ते चमच्याने एक दोन वेळा हलवा आणि लसून थोडा भाजू द्या.आता फोडणीमध्ये हिंग, हळद, काळा मसाला घाला आणि ते मिक्स करा आणि त्यात वाटण आणि बारीक केलेले टोमॅटोचे तुकडे घाला आणि सर्व नीट मिक्स करा मग त्यामध्ये चणा डाळ व काढून घेतलेला कट घाला आणि तो मसाल्यामध्ये चांगल मिक्स करा,चवीनुसार मीठ, आणि शिजवलेली आणि कुसकरलेली चना डाळ मग हे सर्व घालून आमटीला चांगली उकळी येऊ द्या.
कोथिंबीर टाका व सर्व्ह करा.
शुभ संकेत
शुभ -अशुभ मानणाऱ्या लोकांसाठी सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी हा दिवस अतिशय शुभ आहे. धनधान्य, तांदूळ खरेदी करणे, नवनवीन वस्तु खरेदी, बँक खात्यात पैसे जमा करणे, प्रसिद्ध मंदिरात जाऊन भेटवस्तु दान करणे असो किंवा कोणत्याही प्रकारच्या नवीन वस्तू किंवा भांडी खरेदी करणे, गरीब लोकांसाठी अन्न किंवा विशेष प्रसाद दान करणे किंवा गरीब मुलांना शिक्षण शुल्कासह मदत करणे, हे सर्व अक्षय आहेत या सर्वासाठी शुभ संकेत असते हि अक्षय तृतीया.
मान्यते नुसार या दिवशी काय करू नये?
- अक्षय्य तृतीयेच्या दिवशी खरेदीसाठी बाहेर गेला असाल तर रिकाम्या हाताने घरी परतणे शुभ मानले जात नाही. शक्य असल्यास, चांदी किंवा सोन्याचे काहीतरी घेऊन घरी या. दुसरीकडे, जर महागडे दागिने खरेदी करणे शक्य नसेल, तर तुम्ही धातूपासून बनवलेली छोटी वस्तूही घरी आणू शकता.
- अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीसोबत भगवान विष्णूचीही पूजा करावी. या दिवशी दोन्हीची स्वतंत्रपणे पूजा केल्याने अशुभ परिणाम मिळू शकतात. असे मानले जाते की लक्ष्मीसह विष्णूची पूजा केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते.
- अक्षय्य तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा शांत चित्ताने करावी, कारण शांततेने पूजा केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. याउलट, जी व्यक्ती पूजेच्या वेळी गडबड करते किंवा राग आणते, त्याला माता लक्ष्मीचा राग येतो.
Be the first to support
Be the first to share
Comment (0)
Related Blogs & Vlogs
No related events found.
Loading more...